आपला जिल्हा

समाजकल्याणने लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून केली साजरी.

परभणी ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र राज्य सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण कार्यालयाच्या वतीने शुक्रवारी ज्ञानोपासक महाविद्यालयात लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती सामाजिक न्याय दिन म्हणून साजरी केली.

अध्यक्षस्थानी इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक रामेश्वर मुंडे. प्रमुख वक्ते प्रा.भास्करराव गायकवाड होते. प्रमुख पाहुणे म्हणून उपप्राचार्य डॉ. लक्ष्मण बनसोडे, संयोजक सहाय्यक आयुक्त राजू एडके, समाजकल्याण अधिकारी एस. के. भोजने,अधिक्षक बि. एन. स्वामी यांची उपस्थिती होती.
प्रारंभी शाहू,फुले,डॉ.
आंबेडकर या महामनवाचे प्रतिमा पूजन व अभिवादन करून दीपप्रज्वलन केले गेले. सहाय्यक आयुक्त राजू एडके यांनी प्रास्ताविकेत राजर्षी शाहू महाराजांनी आरक्षणास महत्व का दिले यासह राजर्षी शाहू महाराज म्हणजे केवळ एक राजा नव्हे, तर सामाजिक न्यायाचे प्रणेते,
बहुजनांच्या उन्नतीचे आधारस्तंभ,
आणि पुरोगामी विचारांची अखंड ज्योत!
त्यांनी शिक्षण, आरक्षण, अस्पृश्यता निर्मूलन, आणि समाजातील वंचित घटकांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जो संघर्ष केला, तो आजही आपल्याला दिशादर्शक आहे हे सांगीतले.प्रमुख वक्ते प्रा.भास्करराव गायकवाड यांनी सांगितले की राजर्षी शाहू महाराज हे फक्त स्वप्ने दाखवणारे नेते नव्हते, तर त्यांनी त्या स्वप्नांना कृतीची दिशा दाखवली. शिक्षणावर त्यांचा ठाम भर होता कारण शिक्षणाला तेच परिवर्तनाचे मुख्य साधन मानत होते. त्यानुसार त्यांनी वंचित, शोषित, बहुजन, मागास व दुर्बल घटकांसाठी न्याय मिळवण्याकरिता आपल्या राजसत्तेचा आणि संसाधनांचा उपयोग समाजपरिवर्तनासाठी केला, असे प्रा.गायकवाड यांनी नमूद केले.उपप्राचार्य डॉ. लक्ष्मण बनसोडे यांनी शाहू महाराजांच्या कार्यावर विचारमंथन घडवून आणले.अध्यक्षीय समारोपात रामेश्वर मुंडे यांनी सांगितले की,शाहू महाराजांचा एकमेव संदेश होता की,समाजातील शेवटच्या माणसापर्यंत न्याय पोहोचला पाहिजे.असा शाहु महाराजाचा वारसा जपणे, तो नव्या पिढीपर्यंत पोहोचवणे आवश्यक आहे असे सांगीतले.दरम्यान मनिषा जाधव यांनी आंतरराष्ट्रीय नशामुक्त पंधरवडा निमित्त उपस्थितांना नशामुक्तीची प्रतिज्ञा दिली.व शेवटी तंबाखु, गुटखा, मादक पदार्थाची मान्यवरांचे हस्ते होळी केली.
सूत्रसंचालन रेवणअप्पा साळेगावकर यांनी केले तर नामदेव शिंदे यांनी आभार मानले.यशस्वीतेसाठी समाजकल्याण कार्यालयातील कर्मचारी यांनी पुढाकार घेतला.

पोवाडे व गितांचे सादरीकरण ठरले विशेष आकर्षण.

शाहीर काशीनाथ उबाळे, गायिका मनिषा कांबळे, स्मिता खंडागळे सह कलापथकाने राजर्षी शाहू, महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यावर आधारित पोवाडा आणि गीतांचा उत्कंठावर्धक सादरीकरण करून प्रेक्षकांची दाद मिळवली. या पोवाडा व गीतांच्या माध्यमातून उपस्थितांना सामाजिक न्याय, शिक्षणाचे महत्त्व व बहुजन उद्धार याबाबत जागरूक करून गेले.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!