आपला जिल्हा

स्टेट बँक इंडिया सेलूत अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांची होतेय गैरसोय…

कर्ज विभागात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांना नाहक त्रास

सेलू ( प्रतिनिधी ) सेलू शाखेच्या SBIN0003797 वालुर रोड रोड सेलू या ठिकाणी कर्ज विभागात अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे ग्राहकांना होणाऱ्या गैरसोय होत आहे अशा तक्रारीवरून ग्राहक पंचायत सेलुच्या वतीने शाखा व्यवस्थापक श्रीमान विवेक कुमार यांना विचारणा व त्या टेबलवर जोपर्यंत अथोराईज कर्मचारी येत नाही तोपर्यंत पर्यायी व्यवस्था करण्याची विनंती करण्यास गेले आसता व्यवस्थापक विवेक कुमार यांच्या कडुन अनपेक्षित असे उत्तर मिळाले. ते म्हणाले मागील 40 ते अधीक दिवसांपासून या टेबलचे आसणारे श्री प्रविण जायभाय यांची बदली झाली आहे. मी देखील बदली होऊन नुकताच या शाखेचा चार्ज घेतला आहे आम्हि कामाने त्रस्त असतो. आम्हि कर्ज विभागात जोपर्यंत या टेबलवर कोनी नवीन कर्मचारी ऐत नाही तोपर्यंत काहि व्यवस्था करू शकणार नाहीत.

“तुम्हे हमारी जो भी शिकायत करणी है हमारे वरीष्ठ से करे उसका जवाब हम हमारे शिनीयर को देगे लेकीन हम ईस बारे मे कुच नही कर सकते.”

अशा प्रकारची वागणूक शाखा व्यवस्थापक श्रीमान विवेक कुमार यांच्या कडुन अनुभवण्यात आली आहे. खर तर या टेबलवर गृह कर्ज, पेन्शन कर्ज, सोने तारण कर्ज, पिक विमा, पि.एम.सुर्य घर योजना आणि विविध सरकारी योजनांसारखी कर्जे सहज सुलभतेने या पूर्वीचे आसनारे श्री प्रविण जायभाय हे करत होते व तेवढेच चांगले व सहकार्य करणारे या पुर्विचे व्यवस्थापक श्री गावढे साहेब हे होते. तथापि गेल्या ४० ते अधिक दिवसांपासून, या टेबलवर कर्ज मागणी साठि ऐणाऱ्या ग्राहकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या अडचणीमुळे व व्यवस्थापक याच्या आडमुठे पणाच्या धोरणामुळे संर्व सामान्य ग्राहकांची मात्र पंचायत झालेली आहे असे मात्र दिसुन येत आहे.

Related Articles

Back to top button
Don`t copy text!