महाराष्ट्र

परतुर तालुक्यातील उत्कृष्ट बाल वाचकांचा गौरव सोहळा संपन्न

परतूर ( प्रतिनिधी ) मुलांनी खूप पुस्तके वाचावीत .वाचनाचा संस्कार त्यांच्यावर व्हावा . त्या संस्कारातून नीतीमूल्य त्यांच्या मनात रुजावीत. यासाठी अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राने पुस्तक वाचन स्पर्धेचे आयोजन केले होते . त्यातील जास्तीत जास्त पुस्तके वाचणाऱ्या 20 उत्कृष्ट बालवाचकांचा गौरव सोहळा संत तुकाराम गुरुकुल लिखित पिंपरी ता.परतुर या ठिकाणी आबा सोळंके, कल्पना भागवत, विनोद भागवत, साने गुरुजी कथामालेच्या कल्पना हेलसकर ,अक्षर आनंद वाचन संस्कार केंद्राचे मुख्य प्रवर्तक विनोद शेंडगे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, सन्मानपत्र, ग्रंथ भेट देऊन सन्मान केला.तसेच ‘चला उधळू या रंग वाचनाचे ‘ या बौद्धिक सोहळ्यात बालवाचकांनी पुस्तके वाचून नोंदी केलेल्या वह्यांचे निरीक्षण व चर्चा, चालता बोलता… वाचनावर गप्पा, बालवाचकांचे कवी संमेलन ,कथाकथन, वाचलेल्या पुस्तकावर गटचर्चा ही सत्र झाली.

कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रदीप शिंदे मंताजी ठाकरे,अनिता तांगडे,पांडुरंग सोळंके, रूपाली गंगासागरे यांनी पुढाकार घेतला.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!