सेलू ( प्रतिनिधी ) महाराष्ट्र शासनाने सूचना दिलेल्या होत्या की मराठा कुणबी दाखले कोणाचीही आडवनुक न करता तात्काळ देण्यात यावेत. पण सेलू येथे असे होताना दिसत नाही दाखल्यांसाठी एक महिन्याच्या वर वेळ लागत आहे. अगोदर एवढा वेळ लागत नव्हता तसेच लाभार्थ्यांची आर्थिक पिळवणूक पण होत आहे. दाखले देण्यासाठी टाळाटाळ होत आहे. वेगवेगळी कागदपत्रे व कारणे सांगून मराठा समाजाची आडवणूक होत आहे. आपल्या कार्यालयात मराठा कुणबी दाखल्यासाठी हेलपाटे मारून लोक मेटाकुटीला आले आहेत. तरी तात्काळ मराठा समाजाची आडवणून न करता कुणबी मराठा दाखले देण्यात यावे. तसेच सेलू तालुक्यातील काही मोजक्या गावाच्या मराठा कुणबी नोंदी सापडले आहेत व नवीन नोंदी सापडण्यासाठी आपले प्रशासन उदासीन आहे. त्यामुळे मराठा समाज वंचित राहत आहे. तरी नवीन नोंदी सापडण्या साठी प्रयत्न करावेत. नसता आपल्या कार्यालयात मराठा समाजातर्फे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल. याची नोंद घ्यावी असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी जयसिंग शेळके, अशोक ताठे, पांडुरंग कदम, महादेव खरात, रमेश शेळके, बाबासाहेब कदम, ज्ञानेश्वर फाटे, शरद मोगल,सखाराम डासाळकर, निशिकांत रोडगे, निळकंठ पवार, माणिक हावळे, अशोक गोरे, बापुराव डख, सुधाकर साखरे, गोविंद ताठे, मोहन ताठे, देविदास ताठे, प्रल्हाद थोंबाळ, कल्याण ताठे, शाम ताठे, मोहन ताठे, नारायण ताठे, वैभव सोळंके, सकल मराठा समाज सेलू तालुका आदी उपस्थित होते.