सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथे परशुराम जन्मोत्सव समिती आणि ब्राह्मण महिला भगिनींच्या वतीने समाजातील पती गमावलेल्या महिलांना प्रवाहात आणण्याच्या हेतूने भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
व्यासपीठावर अध्यक्षस्थानी सुयशा जोशी तर शैलजा अंबेकर, तथा डॉ. देऊळगावकर यांची विशेष उपस्थिती होती. महिलांशी हितगुज करताना देऊळगावकर यांनी “ह्या महिला तेजस्विनी आहेत जीवनात घराच्या बाहेर न पडणा-या सर्व व्यवहार पाहत घर सांभाळतात मग त्यांना महत्त्व का नसावे?” असा प्रश्न केला तर वसेकर यांनी “मानिनीचा दर्जा महिलांनी सोडू नये “असे स्पष्ट केले. अध्यक्षीय समारोपात सुयशा जोशींनी “गुन्हेगाराच्या शिक्षेसाठी एकही निरपराध बळी जाऊ नये,असा संविधानात उल्लेख असताना अशा अनेक निरपराध महिलांना आम्ही शिक्षा देतो हे योग्य नाही” असे समजावले. कार्यक्रमाच्या हितगुजाने महिला गहिवरल्या. गतधवा महिलांतून करुणा जोशी या महिलेने आपबिती कथन केली. कार्यक्रमाची सुरुवात प्रतिमापूजन तथा मोहिनी चिटणीस यांच्या स्वागत गीताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मेघा चौधरी यांनी केले तर पाहुण्यांचा परिचय मंजुषा शेलगावकर यांनी दिला. प्रास्ताविक जयश्री सोन्नेकर यांनी केले. यादीवाचन वैशाली कुलकर्णी यांनी केले. भाग्यश्री सोन्नेकर यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठीसाठी पल्लवी कुलकर्णी, आरती दिक्षीत, अपर्णा वडकर, धनश्री देशमुख आणि परशुराम जन्मोत्सव समितीच्या सदस्यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास महिलांची भरपूर संख्येने उपस्थिती होती.