सेलू ( प्रतिनिधी ) श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल.के.आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी तनिष्का तेलभरे राष्ट्रीय विज्ञान संगोष्ठी (नॅशनल सायन्स सेमिनार )२०२४ मध्ये उपविजेता.
मुंबई नेहरू विज्ञान केंद्र मुंबई येथे नॅशनल कौन्सिल ऑफ सायन्स म्युझियम्स आयोजित राष्ट्रीय विज्ञान संगोष्ठी (नॅशनल सायन्स सेमिनार )२०२४ मध्ये श्रीराम प्रतिष्ठान संचलित एल.के.आर. रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी तनिष्का तेलभरे यांनी उपविजेतेपद प्राप्त केले. “कृत्रिम बुद्धिमत्ता – संभाव्यता व सऱोकार” या विषयावर आयोजित या स्पर्धेत भारतभरातून निवड झालेल्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. प्रथम परीक्षा, नंतर प्रस्तुतीकरण आणि शेवटी प्रश्नोत्तरे या तीन टप्प्यांतील स्पर्धेत तनिष्काने उत्कृष्ट कामगिरी करत आपले कौशल्य सिद्ध केले या यशासाठी तनिष्काच्या मार्गदर्शक शिक्षक प्रा. नारायण चौरे यांनी विशेष योगदान दिले. तनिष्काच्या राष्ट्रीय विज्ञान सेमिनारमधील उपविजेतेपदाच्या यशाने संपूर्ण शालेय कुटुंबात उत्साह निर्माण झाला आहे. या यशात डॉ. संजय रोडगे यांचे मार्गदर्शन आणि प्रेरणा मोलाची ठरली आहे. श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष असलेले डॉ. रोडगे यांनी तनिष्काच्या कठोर परिश्रम आणि निष्ठेचे खूप कौतुक केले.तनिष्काच्या या उल्लेखनीय यशानिमित्त श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांनी अभिनंदन केले. विशेष म्हणजे, मुंबई येथील ताज हॉटेलमध्ये विद्यार्थ्यांना विशेष स्नेह भोजन देऊन हे यश साजरे करण्यात आले. यावरून दाखवते की शाळा आपल्या विद्यार्थ्यांच्या यशावर किती अभिमान बाळगते. डॉ रोडगे यांनी तनिष्काला फक्त शैक्षणिक विषयातच नाही तर आत्मविश्वास वाढविण्यातही मदत केली. त्यांनी तनिष्काला नेहमीच प्रोत्साहन दिले आणि तिच्यातील वैज्ञानिक क्षमता ओळखून तिला घडवण्यासाठी प्रयत्न केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे तनिष्काला स्वतःवर विश्वास वाटला आणि तिने या स्पर्धेत उतरून आपल्या शाळेचे नाव उंचावले. श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे, संस्थेच्या सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे, प्रिंसिपल कार्तिक रत्नाला, प्रगती क्षीरसागर आणि इतर शिक्षकवर्ग यांनीही तनिष्काच्या यशाला उजळणी दिली व अभिनंदन केले. डॉ संजय रोडगे, प्रगती क्षीरसागर व तनिष्काचे पालक अनंत तेलभरे यांनीही या कार्यक्रमासाठी मुंबई येथे उपस्थित राहून या घवघवीत यशाचे साक्षीदार झाले. तनिष्काच्या राष्ट्रीय विज्ञान सेमिनारमधील उपविजेतेपदाच्या यशाने संपूर्ण महाराष्ट्रात एक आनंदाचे वातावरण आहे. परभणी जिल्ह्यातूनच नव्हे तर राज्याच्या कानाकोपऱ्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. एका ग्रामीण भागातील विद्यार्थिनीने आपल्या मेधावीपणाने महाराष्ट्र राज्याचे नाव उंचावले आहे.