जिंतूर ( प्रतिनिधी ) जिंतूर सेलू विधानसभेची निवडणूक प्रचार रणधुमाळी सुरू आहे वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सुरेश नागरे यांच्या प्रचारार्थ प्रकाश आंबेडकर यांची जाहीर सभा जिल्हा परिषद मैदानावर पार पाडली असून त्यांनी ओबीसी, एससी, एसटी आरक्षण वाचवण्यासाठी, तसेच पैगंबर,महापुरुषांच्या बाबतीत बेताल वक्तव्या करणाऱ्यावर कठोर कायदा करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार निवडून द्या म्हणून आव्हान केले आहे.
जिंतूर शहरातील जिल्हा परिषद मैदानावर दिनांक 17 नोव्हेंबर रोजी दुपारी 12;30 च्या सुमारास वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांची भव्य जाहीर सभा संपन्न झाली या सभेमध्ये बोलताना त्यांनी सांगितले की ज्याप्रमाणे ओबीसी समाजाचा राजकीय आरक्षण कोर्टामार्फत थांबवण्यात आले त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेतील नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषद आदी ठिकाणी ओबीसी उमेदवारांना आरक्षण नसल्याने उमेदवारांना संधी मिळणार नाही तसेच यापुढे राजकीय व नोकरीचा देखील आरक्षण गोठवून टाकलें जाऊ शकते तसेच एस सी, एसटी समाजाच्या आरक्षणात देखील एका कुटुंबात एकदा आरक्षणाचा लाभ मिळल्यास त्या कुटुंबातील इतर सदस्यांना मात्र एससी, एसटी, प्रवर्गातून आरक्षण मिळणार नाही,प्रेषीत मोहम्मद पैगंबर सह महापुरुषांच्या बाबतीत बेताल वक्तव्य केल्यास त्यासाठी कोणताही कायदा नाही म्हणून आपली मागणी आहे त्यासाठी आपण कठोर कायदा करणारं आहे.शिवसेनेचे माजी मुख्यमंत्री म्हणतात आम्ही बाबरी मशीद पाडली म्हणून मुस्लिम समाजाला आमचें आवाहन आहे की महाराष्ट्रातील ३२ विधानसभे च्या जागेवर शिवसेना शिंदे गट व शिवसेना ठाकरे गट चे उमेदवारांसमोर वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार आहे त्यामुळे मुस्लिम समाजाने आमच्या उमेदवारांना विजयी करावे.ओबीसी, एससी एसटी सह सर्व आरक्षण वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार निवडून द्या ते उमेदवार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील म्हणून आवाहन केले.