आपला जिल्हा

समाजाच्या ऋणाईतुन उत्तराई होणं अवघड पण जिव्हाळा जपला याचा आनंद … शिवशंकर नावाडे

सेलू: प्रतिनिधी
समाज जेव्हा आपल्या कार्यकर्तृत्वाची नोंद घेतो ते अत्यंत महत्त्वाचे होय . वेळ आणि सातत्य टिकवून ठेवण्यासाठी त्याग करावा लागतो. समाजहितासाठी पराकाष्ठा,परिश्रम, जिज्ञासा, समर्पक भाव हे सर्व महत्त्वाचे घटक आहेत. दोष देण्यापेक्षा आपलं कर्तव्य म्हणून काम केलं जावं. संसार आणि अडचणी या जोखडातून वेळ काढून आपल्यातील चांगल्या कल्पकवृतीतुन आकार देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. केवळ नकारात्मक भूमिका न ठेवता चांगल्याचा स्विकार करण्याची तयारी ठेवा. सकारात्मक , सामाजिक, उत्तरदायित्व,हा त्रिगुणात्मक योग लक्षात घेऊन आपलं पथक्रमण असायला हवं . आपला वेळ चांगल्या गोष्टीसाठी दिला जावा या मताचा मी आहे. व्यक्त होण्यात मोठेपणा आहे , संवादातून वाद निर्माण न करता समाजातील दुर्बल घटकांसाठी आपलं कर्तव्य म्हणून काम केलं पाहिजे.असं सत्काराला उत्तर देताना वीरशैव समाजभूषण पुरस्कार प्रदान सोहळ्यात शिवशंकरअप्पा नावाडे बोलत होते.
मानवी जीवनात जगताना चांगलं, वाईट या दोन्ही गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत.आपण काय स्विकारलं पाहिजे , काय नाकारलं पाहिजे , याचा सारासार विचार करण्याची बौद्धिक क्षमता आपल्यात असली पाहिजे. असं प्रतिपादन प्रमुख अतिथी म्हणून दत्तात्रय मिटकर यांनी केले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी अशोक वाडकर म्हणाले समाजासाठी चांगले काम करण्याची इच्छा, प्रेरणा तरुणांना मिळावी यासाठी असे धार्मिक कार्यक्रम आयोजित केले जातात.तरुणपिढीला विचार देताना आपलं कौशल्य पणाला लावलं पाहिजे.नम्रता, सकारात्मक , सामाजिक दृष्टीकोन हे समोर ठेवून समाजासाठी योगदान दिले जावं . कमीपणा न ठेवता आपल्या सद्सद्विवेक बुध्दीच्या जोरावर आपलं कर्तव्य निभवावं . आपली कृती विश्वासपात्र असेल तर समाज पाठीशी उभा राहातो. योग्य वेळी योग्य योगदान अल्प का असेना दातृत्वं, कर्तृत्वाचा भाव जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
यावेळी विजया भगत , सचिन नावाडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
प्रतिवर्षी समाजातील दोन व्यक्तींचा सेवागौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.सन :२०२३ यावर्षीचे मानकरी शिवशंकर शिवरामअप्पा नावाडे व जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एक महिला विजया प्रकाशअप्पा भगत या दोन व्यक्तींचा वीरशैव समाजभूषण गौरव सन्मान सोहळा करण्यात आला.
व्यासपीठावर देवस्थानचे अध्यक्ष अशोकअप्पा वाडकर, प्रमुख अतिथी दत्तात्रय मिटकर, सत्कारार्थी शिवशंकरअप्पा नावाडे,सौ.लता नावाडे , विजया , प्रकाशअप्पा भगत,, इत्यादी…
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन देवस्थानचे सचिव प्रा.मिलिंद झमकडे, तर प्रमाणपत्र वाचन इरवंतअप्पा मठपती, निर्मला मठपती, आभार सहसचिव शुभंम महाजन यांनी व्यक्त केले.
श्री.शंकरलिंग भगवंत यांच्या पालखीची शहरातुन भव्य मिरवणूक,कलशधारी मुली महिला भजनी मंडळ ,टाळ मृदंग, ढोल ताशाच्या निनादात पालखी सोहळा संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बालासाहेब सरकाळे , सोमनाथ सोळंके, संजय झमकडे, पवन मिटकरी, विश्वनाथ हुगे, ऍड.शाम राऊत, शुभंम सोळंके, सुभाष मोहकरे , ज्ञप्रमोद थळपती, पवन कामटे, बाळा वीर ,प्रकाश साखरे , सुजित मिटकरी, शुभंम नवघरे, प्रथमेश भगत , अरविंद चौरे ,सोनु राऊत, शंतनु महाजन, दत्तात्रय चौरे, महेश शेटे,शिवानंद सोळंके,किरण भगत,इत्यादी.
कार्यक्रमासाठी प्रतिष्ठित नागरिक राजेंद्रअप्पा नावाडे , , विश्वनाथअप्पा फरीदखाने , राजेंद्रअप्पा महाजन, संजय बरिदे , संजय झमकडे, शिवकुमार नावाडे ,गणपत मिटकरी, सुभाष मिटकरी,, महिला शिवभक्त, पुरुष शिवभक्त, इत्यादी मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!