आपला जिल्हा

नूतन कन्या प्रशालेने रूजवली जीवनमूल्ये

डॉ.इच्छा शिंदे यांचे प्रतिपादन, सेलूत माजी विद्यार्थिनी मेळावा उत्साहात

सेलू ( प्रतिनिधी ) अभ्यासक्रम पूरक उपक्रमातून विद्यार्थिनींचा व्यक्तिमत्व विकास करतानांच आमच्यावरती माणूस घडविण्याची जीवनमूल्ये रूजवली. तसेच चारित्र्य, त्याग नम्रता या संस्कारातून आम्ही घडत गेलो म्हणूनच आज आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रात स्वाभिमानाने उभे आहोत, असे प्रतिपादन पहिल्या बॅचच्या माजी विद्यार्थिनी प्रा.डॉ.इच्छा शिंदे यांनी रविवारी, २९ डिसेंबर रोजी उद्घाटनप्रसंगी व्यक्त केले.

सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्थेच्या श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त २८, २९ डिसेंबर रोजी माजी विद्यार्थिनी मेळाव्यात विविध कार्यक्रम झाले. उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया होते. व्यासपीठावर माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, उद्योजक रामप्रसाद घोडके, संस्थेचे सचिव प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, उपाध्यक्ष डी.के.देशपांडेगुरुजी सहसचिव जयप्रकाश बिहाणी, शालेय समिती अध्यक्ष नंदकिशोर बाहेती, प्रकाशचंद्र बिनायके, दत्तराव पावडे, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, राजेश गुप्ता, मुख्याध्यापिका निशा पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रशालेच्या परिसरात उभारण्यात येत असलेल्या स्वर्णमयी सभागृहाच्या बांधकामासाठी माजी विद्यार्थिनींनी देणगी जाहीर करीत कृतज्ञता व्यक्त केली. या वेळी उद्योजक रामेश्वर राठी, अजित बिनायके, केंद्रप्रमुख एकनाथ जाधव, उज्वला लड्डा, मालिनी वाघोलीकर, माजी विद्यार्थिनी रमा काबरा आदींची उपस्थिती होती. दुपारी चार वाजता मुक्तचिंतन व समारोप झाला.
मेळाव्याच्या यशस्वीतेसाठी संस्थेच्या पदाधिकारी व सदस्यांच्या मार्गदर्शनात मुख्याध्यापिका निशा पाटील, उपमुख्याध्यापक परसराम कपाटे, दत्तात्रय घोगरे, संगीता खराबे सुषमा दामा, रेणुका आंबेकर शशिकांत देशपांडे, सतीश कुंडीकर शंकर बोधनापोड, उपेंद्र दिवाळकर कैलास मलवडे, सुहास देऊळगावकर, नागेश देशमुख भालचंद्र गांजापुरकर, यशवंत कुलकर्णी, कीर्ती राऊत, वैशाली चव्हाण,जयश्री कुंभकर्ण, बाबासाहेब थोरे आदींसह विविध समिती सदस्य, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

विविध कार्यक्रमांतून जागवल्या शालेय आठवणी

मेळाव्याच्या निमित्ताने आयोजित छायाचित्र व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन स्मिता बोरीकर, रिना ठाकूर यांच्या हस्ते झाले‌. गप्पा गोष्टी, शालेय परिसर, वर्ग पाहात, शिक्षकांशी हितगुज साधत आणि विविध खेळांच्या माध्यमातून माजी विद्यार्थिनींनी शालेय आठवणींना उजाळा दिला. सांस्कृतिक कार्यक्रमात विविध कलाविष्कार सादर करून उपस्थितांची मने जिंकली. ‘आम्ही कशा घडलो’ या विषयावरील संवादातून विद्यार्थिनींनी आपले भाव विश्व उलगडले अध्यक्षस्थानी डॉ.अनघा वैद्य होत्या. प्रमुख अतिथी म्हणून रश्मी काला, डॉ.अंजली भाबट, डॉ.रूपाली भारस्वाडकर, डॉ.मधुरा आनंदगावकर, भावना काबरा इंजिनियर प्रीती लोया, श्रेया भराडिया तसेच स्वरा देशपांडे, समीक्षा कुलकर्णी यांची उपस्थिती होती. सूत्रसंचालन कैलास मलवडे यांनी केले. शंकर बोधनापोड यांनी आभार मानले. माझी शाळेविषयी कल्पना (सुधारणा, योजना) या विषयावर विद्यार्थिनी विचार मांडले.

 सेलू येथील श्रीमती लक्ष्मीबाई लालजी रामजी नूतन कन्या प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी मेळाव्याच्या उद्घाटनप्रसंगी मार्गदर्शन करताना प्रा.डॉ.इच्छा शिंदे. या वेळी मान्यवरांची उपस्थिती होती.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!