सेलू: ( प्रतिनिधी ) श्रीराम प्रतिष्ठान, सेलू या संस्थेच्या रौप्य महोत्सवाची सुरुवात ‘सुरभि महोत्सव 2024’ अंतर्गत स्पोर्ट्स डेच्या भव्य आयोजनाने झाली. कार्यक्रम (ता. 24) वार मंगळवार रोजी सॅनरो नॉलेज सिटीच्या प्रांगणात पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संजय रोडगे होते, तर उद्घाटन माजी नगर परिषद सदस्य मिलिंद सावंत यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून पत्रकार किशोर कटारे (संपादक न्यूज महाराष्ट्र 36 ), रवळगाव सरपंच दीपक रोडगे, शिंदेटाकळी सरपंच कैलास पवार आणि रोहिणी बोराडे उपस्थित होते. कार्यक्रमात संस्थेच्या सचिव डॉ. सविता रोडगे, प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे तसेच घटक संस्थांचे मुख्याध्यापक, शिक्षक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाची सुरुवात हॉकीच्या जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आली त्यानंतर श्रीराम प्रतिष्ठान ध्वजारोहण व मशाल मान्यवरांच्या हस्ते पेटविण्यात आली. यानंतर एल के आर आर प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल, ज्ञानतीर्थ विद्यालय, प्राॅस्परस पब्लिक स्कूल, एकात्मिक आदिवासी प्रकल्प, अपूर्वा पॉलिटेक्निक, आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, डॉ.राम रोडगे डीएड व बी एड कॉलेज, च्या विद्यार्थ्यांनी सुंदर पद्धतीने पथसंचलन सादर केले. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या महोत्सवाचे आयोजन करण्यात येते पालकांनी आपल्या पाल्यांना विविध स्पर्धेत सहभागी केले पाहिजे. खेळातून विद्यार्थ्यांची खिलाडूवृत्ती निर्माण व्हावी. सर्व समाजाला सोबत घेऊन विद्यार्थी हाच केंद्रबिंदू समजत श्रीराम प्रतिष्ठानची सेलू शहरात उभारणी केली. शासनाच्या योजना अंतर्गत आपल्या भागातील आदिवासी समाज व धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम या शैक्षणिक संकुलात करण्यात येते. असे मते मिलींद सावंत यांनी मांडले. सन 1999 साली श्रीराम प्रतिष्ठान संस्थेची स्थापना केली. शाळेत नाविण्यपूर्ण उपक्रमासह विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने विविध घटक संस्था स्थापन केल्या. आज संस्थेला 25 व्या वर्षांत यशस्वी प्रवास सुरू आहे. यासह आदी विविध संस्थेच्या प्रवासाबद्दल प्रकाश टाकत भविष्यातील ध्येयांविषयी माहिती डॉ रोडगे यांनी अध्यक्षीय समारोपात दिली. प्रास्ताविक धम्मपाल ठोके यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डिगांबर टाके, संदिप आकात व कल्पना भाबट,यांनी केले.