सेलू ( प्रतिनिधी ) सेलू तालुक्यातील आहेर बोरगाव येथे दि. 1 फेब्रुवारी, नितीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय प्रशालेच्या स्नेहसंमेलनाप्रसंगी उपविभागीय पोलीस अधीक्षक मा. श्री. सुनील ओव्हाळ यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना उद्देशून त्यांनी आपल्या भाषणात विद्याधन हे सर्वश्रेष्ठ धन आहे. विद्येमुळे विद्यार्थ्याला जीवनाचा अर्थ प्राप्त होतो. (विद्याधनम, सर्वधनम, प्रधानम) एकाग्रता ही यशाची गुरुकिल्ली आहे. ज्या विद्यार्थ्यांमध्ये शिस्त आणि एकाग्रता राहील तो उच्च पदावर जाईल. विद्यार्थी हा बुद्धिमान असावा कारण बुद्धिमान विद्यार्थी यशाचे शिखरे गाठतात. यश हे परिस्थितीवर नाही तर मन:स्थितीवर अवलंबून असते.
म्हणून प्रत्येक विद्यार्थ्याने सकारात्मक राहणे गरजेचे आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासूनच वेगवेगळ्या स्पर्धापरीक्षेची तयारी करावी असे प्रतिपादन सुनील ओव्हाळ साहेबांनी केले. याप्रसंगी त्यांनी स्वामी विवेकानंद ग्रंथालयाला स्पर्धा परीक्षेसाठी 10000 रुपयाचे ग्रंथसंपदाभेट देण्याचे जाहीर केले.कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थितीमध्ये मा. श्री. आत्मारामजी कुटे (ग्रामीण कवी) यांनी शेतकऱ्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या अनेक कविता सादर केल्या. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.राजेंद्र काका लहाने उपस्थित होते.त्याचबरोबर प्रशालेचे मुख्याध्यापक मा. श्री.सर्जेराव लहाने,बापुराव लहाने,ज्ञानेश्वर लिपणे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत गीताने झाली.स्वागत गीतानंतर राष्ट्रमाता, राजमाता मा साहेब जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रमुख पाहुण्याचा परिचय श्री.आवचार जी.डी.यांनी करून दिला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री.लाडाने पी.एम.यांनी केले. अध्यक्षीय समारोप संस्थेचे अध्यक्ष मा. श्री.राजेंद्र काका लहाने यांनी केले.तर आभार प्रदर्शन श्री. आंधळे व्ही.जी.यांनी केले. या कार्यक्रमास प्रतिष्ठित नागरिक, गावकरी मंडळी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.