सेलू ( प्रतिनिधी ) देशासह महाराष्ट्रातील मुस्लिम समाजाची शैक्षणिक, राजकीय, आर्थिक, सांस्कृतिक अवस्था बिकट झाली असुन या सर्वच क्षेत्रांमध्ये मुस्लिम समाज दिवसेंदिवस पिछाडत चालला आहे. या शिवाय मुस्लिम समाजावर व त्यांच्या धार्मिक स्थळांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. या सर्व बाबींवर विचार मंथन करुन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी ध्येय धोरण ठरविण्याकरीता दिनांक १७ ऑगस्ट शनिवार रोजी पटेल फंक्शन हाॅल, पटेल नगर, कन्हेरी चौक , लातूर येथे राज्यातील विविध क्षेत्रातील अभ्यासक, विचारवंत, सामाजिक कार्यकर्ते यांची राज्यस्तरीय मुस्लिम आरक्षण – शिक्षण – संरक्षण परीषद अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आली आहे. सदरील परीषदेस परभणी जिल्ह्यातील मुस्लिम बांधवांनी जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हावे असे आव्हान मुस्लिम आरक्षण संघर्ष समितीचे राज्य समन्वयक, जेष्ट सामाजिक कार्यकर्ते शेख महेमुद सर यांनी केले आहे.