सेलू / प्रतिनिधी येथील भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई संचलित विवेकानंद प्राथमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आंतरशालेय स्पर्धा संपन्न झाल्या. बक्षिस वितरण प्रसंगी प्रमुख पाहुणे जिल्हा संघचालक श्री.मुकुंद चौधरी म्हणाले की ,स्पर्धेतुन विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडते.विद्यार्थ्यांनी स्पर्धेला संधी म्हणुन पहावे .धैर्य व परिपक्वता आपल्याला स्पर्धेच्या माध्यमातून मिळते त्या साठी प्रयत्न करावेत असे प्रतिपादन केले. व्यासपीठावर हरिभाऊ चौधरी ,उपेंद्र बेल्लूरकर ,करुणा कुलकर्णी ,मु.अ. शंकर शितोळे ,अनिल कौसडीकर यांची उपस्थिती होती. इयत्ता १ली व २साठी चित्ररंगभरण स्पर्धा घेण्यात आली त्या स्पर्धेत शंतनु मालाणी ( प्रथम -विवेकानंद शाळा) आद्या खजिने (द्वितीय -प्रिन्स इंग्लिश स्कुल) प्रियदर्शनी पवार ( तृतीय -विवेकानंद शाळा)अंकित आघाव ( उत्तेजनार्थ-विवेकानंद शाळा ),इयत्ता ३ री ते ४ थी चित्ररंगभरण स्पर्धेत धनंजय चौधरी ( प्रथम -विवेकानंद शाळा) वरद मोगरे ( द्वितीय-विवेकानंद शाळा )साक्षी लिपणे ( तृतीय -विवेकानंद शाळा) सत्यम वैद्य ( उत्तेजनार्थ -विवेकानंदशाळा) चित्ररंगभरण स्पर्धेचे परीक्षण पांडुरंग पाटणकर वमहादेव बोरकर यांनी केले. इयत्ता ५ वी ( स्कॉलरशिप ) स्पर्धेत विठ्ठल बोरसे ( प्रथम-नूतन विद्यालय ) वेदांत काकडे ( प्रथम -विवेकानंद शाळा) प्रज्वल ठाकर (द्वितीय-नूतन विद्यालय ) रायबा भोसले (द्वितीय-विवेकानंद शाळा) मुक्ताई बोधले ( तृतीय -न्यू मॉडर्न) इयत्ता ८ वी स्कॉलरशिप स्पर्धेत शार्दूल जोशी,सक्षम आर्दड,आर्या घांडगे ( प्रथम- नूतन विद्यालय ) क्षितिजा खजिने (प्रिन्स इंग्लिश स्कुल)मैथिली गावंडे ( द्वितीय-नुतन कन्या ) प्राची शिंदे ,दर्शना जोशी ,सोहम आर्दड ( तृतीय-नूतन विद्यालय ) इयत्ता ६ वी साठी निबंध स्पर्धा घेण्यात आली त्यात संचिता होगे ( प्रथम-विवेकानंद शाळा ) गोपाल तोतला ( द्वितीय- विवेकानंद शाळा ) मयुरी कानडे ( तृतीय- विवेकानंद शाळा ) सिद्धी मंडलिक ( उत्तेजनार्थ – विवेकानंद शाळा ) निबंध स्पर्धेचे परीक्षण शरद ठाकर यांनी केले.इयत्ता ७ वी साठी वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आली त्यात स्वस्ति घन (प्रथम- विवेकानंद शाळा) समिक्षा कुलकर्णी (द्वितीय-नूतन कन्या ) सई कुलकर्णी (तृतीय-नूतन कन्या ) वक्तृत्व स्पर्धेचे परीक्षण यशवंत कुलकर्णी व सुनीता सबनीस यांनी केले.सूत्रसंचालन विजय चौधरी ,प्रास्ताविक अनिल कौसडीकर ,पद्य शालवी जोशी व विद्यार्थीनी संच ,आभार शंकर शितोळे यांनी मानले. समारोप सामूहिक पसायदानाने झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रागिणी जकाते ,विनोद मंडलिक ,काशिनाथ पांचाळ ,दीपाली पवार ,शारदा पुरी ,स्वप्नाली देवडे ,सोनाली जोशी ,चेतन नाईक ,चंदू कव्हळे ,अर्चना निळे ,निर्वळ ,रसिका बावणे ,सेवक दत्ता गिरी ,दिगंबर खुळे यांनी प्रयत्न केले.