आपला जिल्हा
छत्रपती शिवरायांमुळे स्वातंत्र्याची पहाट शिल्लक आहे – सौरभ करडे
सेलू ( प्रतिनिधी ) .देश ,देव आणि धर्म रक्षणासाठी छ.शिवाजी महाराजांनी आपल्या सकल सुखाचा त्याग केला.ते भोगी नव्हे तर श्रीमंत योगी होते असे म्हणाले. मुघल व परकीय आक्रमकांच्या अन्याय अत्याचाराविरुद्ध शौर्याने लढा देऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केल्यामुळे आज स्वातंत्र्याची पहाट शिल्लक असून आपण हिंदू म्हणून जिवंत आहोत असे प्रतिपादन शिवकालीन इतिहासाचे गाढे अभ्यासक सौरभ करडे यांनी येथील एका व्याख्यान कार्यक्रमात केले.
भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाईची विवेकानंद प्राथमिक विद्यालय सेलू च्या वतीने मागील ११ वर्षांपासून आयोजित करण्यात येत असलेल्या स्व.जनुभाऊ रानडे स्मृती व्याख्यानमालेचे हे १२ वे वर्ष आहे त्यातील दुसरे पुष्प गुंफताना छ.शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या ३५० व्या .वर्ष पूर्ती निमित्ताने सेलू येथे दि.४ फेब्रुवारी रोजी आयोजित स्व.जनुभाऊ रानडे यांच्या स्मृती व्याख्यानमालेत
” शिवरायांचा आठवावा प्रताप ” या विषयावरील व्याख्यानात त्यांनी वरील प्रतिपादन केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यवाह मा.हेमंतजी वैद्य हे होते.तर व्यासपीठावर संयोजक श्री. उपेंद्र बेल्लूरकर व हरिभाऊ चौधरी यांची उपस्थिती होती.
नूतन विद्यालयाच्या रा.ब गिल्डा सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमाचा प्रारंभ मान्यवरांचे हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमापूजनाने झाला.प्रारंभी स्वामी विवेकानंद विद्यालयातील कु.शालवी सावरगावकर आणि विद्यार्थीनी समूहाने स्वागत गीत सादर केले. गौतम सूर्यवंशी यांनी प्रास्ताविक केल्यानंतर करूणा कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला .शंतनू पाठक यांनी समर्पक वैयक्तिक पद्य गायिले