आपला जिल्हा
कृषी उत्पन्न बाजार समिती सेलूत तब्ब्ल वीस दिवसापासून कापसाचे लिलाव बंद
डॉ. संजय रोडगे ऍड दत्तराव कदम सह संचालक यांची बिट पूर्ववत चालू करण्याची सहाय्यक निबंध, कृषी उत्पन्न बाजार समितीकडे निवेदनाद्वारे मागणी.

सेलू ( प्रतिनिधी ) कृषी उत्पन्न बाजार समिती सेलूत तब्ब्ल 20 दिवसापासून कापसाचे लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांची होणारे आर्थिक नुकसान होत असलेली हेळसांड थांबविण्यासाठी डॉ. संजय रोडगे ऍड दत्तराव कदम सह संचालक यांची कापसाचे बिट पूर्ववत चालू करण्याची सहाय्यक निबंध, कृषी उत्पन्न बाजार समितीकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
या निवेदनात मागील संचालकांच्या बैठकीमध्ये वाद होऊन व्यापाऱ्याबद्दल अपशब्द वापरून व्यापाऱ्यांना मारहाण करण्यात आली. या कारणाने व्यापाऱ्याने मार्केट यार्ड मधील कापूस लिलावावर बहिष्काराचे पाऊल उचलले यामुळे मागील 20 दिवसापासून मार्केट यार्ड मध्ये लिलाव पुकारण्यात आलेला नाही. यामुळे व्यापाऱ्या बाबत शेतकऱ्यांमध्ये उलटसुलट चर्चा होत असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे तसेच व्यापाऱ्याला संचालकाकडून झालेल्या मारहाणीमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे या प्रकरणामुळे मार्केट यार्ड कमिटीचे उत्पन्नामध्ये घट होत असून कर्मचाऱ्यांचे पगार थकीत आहेत. याबाबत आपणास वारंवार सूचना देऊनही आपल्याकडून कारवाई करण्यात आली नाही.
तरी माननीय साहेबांनी सर्व सभापती, संचालक, सचिव यांची ताबडतोब बैठक बोलून यावर योग्य सन्मानजनक तोडगा काढून शेतकरी व व्यापारी यांचे नुकसान होणार नाही याबद्दल प्रयत्न करावे.
या मागणीचे निवेदन डॉ. संजय रोडगे, यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी तालुका अध्यक्ष ऍड. दत्तराव कदम कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक सेलू तसेच अनिल पवार, रामेश्वरजी राठी,शैलेश तोष्णीवाल,सौ.गोकर्ण पडघन,गणेश आकात,सौवर्षा सोळुंके,सौ.आणिता ताठे यांच्या स्वाक्षरीत सहाय्यक निबंध, कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यालय सेलू यांना दिले आहे.
शनिवार दि 30 मार्च रोजी जिल्हा उपनिबंधक यांच्या सूचनेप्रमाणे व्यापारी व बाजार समिती यांच्यात समेट घडविण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
परंतू कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू कडून सन्मानजनक प्रस्ताव मिळाला नाही. व्यापारी बांधव तोडगा निघावा याच भूमिकेत आहेत. संचालक शैलेश तोष्णीवाल