सेलू, ( प्रतिनिधी ) ता.१४ माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांच्या नेतृत्वात सेलू येथील व्यापाऱ्यांनी परभणी जिल्हाधिकारी श्री. गावंडे यांना गुरूवारी (ता.१४) रोजी निवेदन सादर केले.
सदरील निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की, नगर परिषद सेलू जिल्हा परभणीची शहरातील मोकळ्या जागा व गाळे वरील अवाजवी केलेले भाडेवाढ व अधीमूल्य प्रस्ताव तात्काळ रद्द करण्यात यावा. ही प्रमुख मागणी करण्यात आलेली आहे. नगर परिषद सेलू ने मालमत्तेतील शहरातील एकूण अंदाजे 975 गाड्यांचे व मोकळ्या जागेचे भाडे निश्चित करून अधिमूल्य ठरवण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालय पाठवून शहरातील गाळ्यांचे व मोकळ्या जागेचे अवाजवी भाडे निश्चित करून मोठ्या प्रमाणावर दोनशे ते तीनशे टक्के भाडेवाढ व प्रत्येक गाळे मोकळी जागा धारकाला आवाच्या सव्वा दराने लाखो रुपयांचे आदी मूल्य ठरविण्यात आली आहे. त्याचा मोठ्या प्रमाणात उदंड सामान्य नागरिक तसेच व्यापारी वर्गाला भविष्यात बसणार आहे. अगोदरच कोरोना महामारी संकटातून बाहेर निघालेल्या व मोठ्या आर्थिक अडचणीत असलेल्या सर्वसामान्य व व्यापारी अजूनही सावरलेला नाही. ही प्रचंड जुलमी भाडे वाढ व लाखो रुपये अधिमूल्य निश्चित करून व्यापाऱ्यांना देशोधडीला लावून त्यांचे कुटुंब रस्त्यावर आणण्याचे हे काम नगर परिषद सेलू ने पाठविलेल्या प्रस्तावातून दिसत आहे त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण तयार झाले आहे. यामुळे व्यापारी व त्यांच्या कुटुंबामध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष निर्माण झाला आहे. विशेष भाग म्हणजे शहरातील सर्वच गाळे व मोकळी जागा धारक यांना कुणाला कमी कुणाला जास्त प्रमाणात प्रमाणात भाडेवाढ व आधीमुल्य लावलेले आहेत. याबाबत सर्व दुकानदार भाडेकरूंना विश्वासात घेऊन व चर्चा करून थोड्याफार प्रमाणात भाडे वाढ करावी व कुठलीही अधिमुल्य लावू नये सदरील प्रस्ताव मध्ये परभणी जिल्हाधिकारी यांनी स्वतः लक्ष घालून हा प्रस्ताव रद्द करून सेलू शहरातील अंदाजे 975 व्यापारी व त्यांच्या कुटुंबांचा म्हणजे जवळपास 5000 व्यक्तींचा सहानुभूती विचार करून योग्य ती निर्णय घ्यावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आली आहे. दिलेल्या निवेदनावर भाजप शहराध्यक्ष अशोक अंभोरे, धनराज गादीया, आनंद जाधवानी, विठ्ठल कोकर, नारायण बालचंदाणी, सन्नी कुकरेजा, प्रसाद शिकारे,गिरीश गुरबानी, विशाल संघई,नागोराव देशमुख,रमेश शिकारे,मीर आलम, कवडे पाटील,संतराम कास्टे,दीपक दायमा,नीरज लोया, सुरकांत जाधव , जॉली बब्बर,शेख रज्जाक, शाम दळवे,विठ्ठल कोकरे, रियाज भाई गफार भाई यांनी हे निवेदन दिले. यावेळी माननीय जिल्हाधिकारी यांनी सकारात्मक विचार करून तीन ते चार दिवसात मार्ग काढून असे आश्वासन मा. आ. रामप्रसाद बोर्डीकर व व्यापाऱ्यांना दिले आहे आहे.