आपला जिल्हा

सेलू तालुक्यात दुधाची चळवळ गतिमान करणार -अशोक काकडे

सेलू ( प्रतिनिधी ) दिवसेंदिवस शेती व्यवसायाला कमी होत चाललेली निसर्गाची साथ, त्यामुळे आटत चाललेले नैसर्गिक स्रोत, दिवसेंदिवस शेतीचं कमी होत चाललेलं क्षेत्र, मागील दहा वर्षांपासून शेती मालाचे पडत चालेले भाव. आणि वाढत चाललेला महागाईचा भस्मासूर . कमी होत चालेलेले सरकारी रोजगार आणि वाढत चाललेली बेरोजगारी ह्या सगळ्या समस्या येणाऱ्या पिंढ्यांच अवसान गाळणाऱ्या आहेत.

म्हणून आता लोकांनाच लोकांचा लढा उभा करून शेती सोबतच आपले पर्यायी रोजगार उपलब्ध करावे लागतील हे ओळखून आम्ही बळीराजा संघर्ष समितीची स्थापना केली असून गावोगाव पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय उभे निर्धार केला असून येणाऱ्या काळात सेलू तालुक्यात दुध व्यवसायाची चळवळ गतिमान करणार असल्याचे प्रतिपादन बळीराजा संघर्ष समितीचे अध्यक्ष अशोक काकडे यांनी वालूर येथे केले.

वालूर येथील राधिका मंगल कार्यालयात काल दिनांक २२जानेवारी रोजी बळीराजा संघर्ष समितीच्या वतीने ‘दुग्ध व्यवसाय मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मेळाव्याच्या अध्यक्षस्थीय समारोपात अशोक काकडे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर परभणी येथील शासकीय पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राध्यापक डॉ.नितिन मार्कंडेय, उपविभागीय कृषी अधिकारी रवी हरणे,नंद डेअरी फार्मचे संचालक दिगंबर बाबर, महेशजी गमे, सेवानिवृत्त पोलिस अधिकारी प्रल्हाद साल्डेवार,अनिल वाकणकर, रमेश माने, रामेश्वर गाडेकर,विजय भुजबळ,उदय रोडगे, शिवाजी ढगे,विष्णू तात्या कदम,बापुराव काकडे, संतोष खाडप,गणेशराव काष्टे, आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना काकडे म्हणाले की, परभणी जिल्ह्यातील जमीन सुपीक आहे. शिवाय गोदावरी आणि दुधना या दोन नद्या परभणी जिल्ह्यातून जातात या सर्व बाबींचा विचार करून तालुका आणि जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात पशुपालन आणि दुग्ध व्यवसायात उतरण्याचे आवाहन यावेळी काकडे यांनी केले.

दामपुरी येथील नंद डेअरी फार्मचे संचालक दिगंबर बाबर यांनी आपल्या भाषणात सुरवातीला दुग्ध व्यवसायात कोणकोणत्या जोखीम पत्कराव्या लागतात याची विस्तृत चर्चा करीत एच् एफ, जर्सी आणि गीर गायींच्या गुण वैशिष्ट्यांची माहिती देत त्यांची निगा व व्यवस्थापनाचा क्रम यावेळी त्यांनी सांगितला. गोठा, पद्धती, चार व्यवस्थापन, वळू भरल्यानंतर गायीच्या आहार आणि अरोग्याचं व्यवस्थापनचं कौशल्य त्यांनी लोकभाषेत सांगून दूध,कालवड, आणि शेणाची विक्री या तिन मार्गाने शेतकर्यांना उत्पन्न कसं मिळतं यांचं स्वानुभवातून सांगून आपलं मनोगत संपवलं.
तर डॉ. नितीन मार्कंडेय यांनी आपल्या मनोगताला भाकड गायीच्या पालनाच्या यशाची गोष्ट सांगून सुरूवात केली. पशुपालन आणि दुग्ध व्यवसाय हा अत्यंत कमी भांडवलात आणि मोजक्या मानवी श्रमात जादा उत्पन्न देणारा व्यवसाय असल्याचे सांगून येणाऱ्या काळात हा व्यवसाय गावोगाव सुरू करण्यासाठी बळीराजानं पुढाकार घेतल्याबद्दल अभिनंदन केलं. दुग्ध व्यवसाय निष्ठा, जिद्द, चिकाटी आणि वाचनाची जोड देऊन करण्याचं सांगून जनावरांचा डॉक्टर,गोठ्यावर उपचारासाठी नाही तर प्रतिबंधासाठी यावा इतकी नेटानं काळजी दुध उत्पादक शेतकऱ्यांनी घेण्याचे सांगून दुग्ध व्यवसायातील कुठलीही समस्या सोडविण्यासाठी आम्ही सर्वजण चोवीस तास उपलब्ध राहू असे आश्वासन डॉ. मार्कंडेय यांनी दिले. यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी रवी हरणे यांनी पशुपालन आणि दुग्ध व्यवसायवरील शिक्षण आणि प्रशिक्षणाची माहीत सांगून सेवेत असताना आणि सेवानिवृत्तीनंतरही सोबत राहण्याचे आश्वासन दिले.

या मेळाव्यात परीसरातील दुध उत्पादक शेतकरी अविनाश आंधळे, प्रविण काकडे, विठ्ठलराव शिंदे,माऊली राऊत, गिरीश मारोती कलाल आदींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार केला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक कॉ.अशोक उफाडे यांनी केले तर उपस्थितांचे आभार गणेश काष्टे यांनी व्यक्त केले. या मेळाव्यात तालुक्यातील पंधरा गावातील निवडक एकशे बहात्तर पशुपालक व दुध उत्पादक शेतकऱ्यांनी सहभागी होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी
बाबा आंधळे, कल्याण जोगदंड,
कॉ.रामेश्वर पौळ, कॉ.दत्तुसिंग ठाकूर,लक्ष्मण झिंबरे, कल्याण पवार, राजकिशोर जैस्वाल,मथु कवटे, भगीरथ मोरे, बंडू मगर,गणेशराव मुंडे, रमेश धापसे, शिवाजी ढगे,उद्धवराव वाघ, जगन भाबट, बाळासाहेब बरसाले, मुंजाभाऊ काष्टे,रवि कटारे, पुरूषोत्तम गजमल, सिध्देश्वर शिंदे,संदीप काष्टे, अरविंद लहाणे आदींनी परिश्रम घेतले

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!