सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथे सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्ग 548 बी चे काम अत्यंत संथ गतीने होत आहे व कोणतेही नियम न पाळले जात नसल्याने या मार्गावर रोज अपघात होत आहेत तसेच वाहनधारक व पादचारी त्रस्त झाले आहेत.त्या मुळे कामाची गती न वाढविल्यास काम बंद पाडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
त्या अनुषंगाने आज राष्ट्रीय महामार्गाचे इंजिनिअर कामेकर साहेब हे रस्त्याचे काम पाहायला आले असता त्यांची भेट घेऊन होत असलेल्या संथ कामाची तक्रार केली. तसेच काम चालू असताना दिशादर्शक फलक, डायवर्जन बोर्ड लावावे लागतात हे या गुत्तेदाराने लावलेले नाहीत त्यामुळे अपघात होत आहेत वाहनधारक व पादचारी ट्रॅफिक जाममुळे त्रस्त झाले आहेत. याची माहिती नॅशनल हायवे इंजिनिअर यांना दिली व त्यांना धारेवर धरले तसेच कंपनीचे इंजिनियर वर्मा यांना तात्काळ कामाच्या ठिकाणी डायव्हर्जन यांचे बोर्ड तसेच सूचना लावाव्यात व काम लवकरात लवकर करण्यात यावे. व सेलूकरांच्या संयमाचा अंत पाहू नये नसता हे काम बंद पाडण्यात येईल असा इशारा दिला. यावेळी जयसिंग शेळके,राजेश ढगे, दत्तात्रय सोळंके उपस्थित होते.