सेलू,दि.(प्रतिनिधी)स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होऊन देखील ग्रामीण भागातील सर्वसामान्य, कष्टकरी माणसांच्या व्यथा -वेदना कमी न झाल्याचं वास्तववादी चित्रण उमेश मोहिते यांच्या ‘खोडा’ या कथासंग्रहात पहायला मिळतं.असं प्रतिपादन डॉ.राजाराम झोडगे यांनी केले ते स्वामी रामानंद तीर्थ हिंदी मराठी ग्रंथालय सेलू येथे आयोजित ‘एक दिवस एक पुस्तक’ या उपक्रमांतर्गत उमेश मोहिते लिखित ‘खोडा’ या कथासंग्रहावर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.सूनिल कुलकर्णी तर श्री संजय विटेकर, ग्रंथालयाचे सचिव डॉ.शरद कुलकर्णी, श्री खारकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती. आज अवर्षण, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस,नापिकी, योग्य दर न मिळणे अशा समस्या नेहमीच्याच होऊन बसल्या आहेत त्यामुळे मेटाकुटीला आलेले शेतकरी, हाताला काम आणि पोटाला दोन घास न मिळू शकणारे कष्टकरी यांच्या समस्यांचे चित्रण उमेश मोहिते यांनी खोडा या कथासंग्रहात केले आहे. पतीच्या निधनानंतर विधवा स्त्रियांच्या जीवनात पदोपदी येणारे अडथळे,समस्या आणि त्यांच्याशी दोन हात करताना करावा लागणारा संघर्ष, विरळ होत जाणारे नातेसंबंध,अविवाहित मुलांचे प्रश्न, मोबाईलच्या विळख्यात सापडलेली तरुणाई,दोन पिढ्यांतील मूल्यसंघर्ष आणि त्यातून उभे टाकलेले नवे प्रश्न यावर लेखकाने आपल्या कथांच्या माध्यमातून मार्मिक भाष्य केल्याचे सांगून या कथासंग्रहाची वैशिष्ट्ये डॉ.राजाराम झोडगे यांनी उलगडून दाखवली. अध्यक्षीय समारोपात डॉ.सुनील कुलकर्णी म्हणाले वाचन संस्कार व्यक्तीला सर्वगुणसंपन्न करतो. प्रगल्भ विचार, वैचारीक बैठक व स्वभावात बदल वाचनातून होत असतो. विशेष उपस्थिती म्हणून संजय विटेकर यांनी गझल सादर करून उपस्थितांची मने जिंकली. व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांनी शरद संदीपान ठाकर सरांना जिल्हा परिषदेचा उत्कृष्ट आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त झाला त्याबद्दल ग्रंथालयाच्या वतीने सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक ग्रंथालयाचे सचिव डॉ. शरद कुलकर्णी यांनी तर सूत्रसंचालन प्रा.अनंत मोगल, आभार प्रा.आर. एन. कदम यांनी मानले . कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रंथपाल महादेव आगजाळ,सहग्रंथपाल पंडित जगाडे, विलास शिंदे, अनिरुद्ध टाके इत्यादी… कार्यक्रमासाठी उपस्थित प्रा.आनंद देशमुख, रघुनाथ देशमुख, प्रा.डाॅ.गंगाधर गळगे, नारायण इक्कर,अशोकअप्पा वाडकर ,रविंद्र मुळावेकर , गंगाधर गुंजंकर , महेश खारकर, भालचंद्र देशमुख ,प्रा.नागेश कान्हेकर , सर्जेराव लहाने ,प्रा.उगले एस.एस.प्रा.हडसनकर , डॉ.काशिनाथ पल्लेवाड,शरद ठाकर,शेख ऐ.ऐ.विजय प्रधान ,अविनाश जोगे, विजय ढाकणे, सुयोग साळवे इत्यादी.