सेलू ( प्रतिनिधी ) , दि29 डिसेंबर सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभि महोत्सवा अंतर्गत एल के आर आर प्रिन्स इंग्लिश नामांकित निवासी योजनेअंतर्गत प्रवेशित एकात्मिक अदिवासी प्रकल्प व धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांचा‘ महाराष्ट्राची लोकधारा हा बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम (ता.२९) डिसेंबर शुक्रवार रोजी साई नाट्यमंदिर येथे पार पडला.
‘’ महाराष्ट्राची लोकधारा ” या कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री टी डी भरड निरीक्षक समाज कल्याण परभणी, किशोर कटारे संपादक न्युज महाराष्ट्र 36 व पालक प्रतिनिधी नाथा रोडे,काशीराम सोनुले यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष मा.डॉ. संजय रोडगे यांची उपस्थिती होती. तर व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून कैलास पवार सरपंच शिंदे टाकळी,दादासाहेब बोंबले सरपंच डासाळा, प्रभाकरराव गजमल प्रकाश गजमल , संजय गटकळ, रुस्तुम कुरडे, किशोर कारके,श्रीराम प्रतिष्ठानच्या सचिव डॉ.सविता रोडगे श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे ,प्रिन्स इंग्लिश प्राचार्य प्रगती क्षीरसागर, कार्तिक रत्नाला आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमाची सुरवात सरस्वती पूजन, क्रांतीसूर्य बिरसा मुंडा व अहिल्यादेवी होळकर यांचे प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने झाली. आपले उद्घाटनपर मनोगत व्यक्त करताना मा.किशोर कटारे म्हणाले की, डॉ.संजय रोडगे यांनी जो शैक्षणिक प्रवाह निर्माण केलेला आहे त्यामध्ये ते अदिवासी व धनगर समाजातील विध्यार्थ्यासाठी खूप चांगली मेहनत घेत आहेत.या प्रकल्पा अंतर्गत नामांकित शाळा मध्ये याच शाळेचे उलेखनीय कार्य समोर आलेले आहे. अदिवासी विध्यार्थी हे डोंगरात ,रानावनात रहाणारे असल्यामुळे त्यांच्या अंगात कटकता,धाडस हे नैसर्गिक गुण आत्मसात आहेत त्याच गुणांना आकार देण्याच काम डॉ.संजय रोडगे करत आहेत. जिल्हाध्यक्ष आदिवासी संघटना रुस्तुम कुरुडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
डॉ.संजय रोडगे धनगर समाजातील विध्यार्थ्याची जडणघडण करत आहेत ही उलेखनीय बाब आहे.पालक प्रतिनिधी नाथा रोडे यांनी शाळेविषयी समाधान व्यक्त केले.
आपल्या अध्यक्षीय समारोपात डॉ.संजय रोडगे म्हणाले की, विध्यार्थ्याच्या प्रवेशानंतर घडलेला बदल आपणास पहावयास मिळत आहे.शासनाच्या या योजांतून विध्यार्थ्याना अति उच्च दर्ज्याच्या सुविधा देणे हे आमचे आद्य कर्तव्य आहे व हे सर्व पालकांच्या सहकार्या मुळेच शक्य आहे. विध्यार्थी उच्च दर्ज्याचे अधिकारी व्हावेत हेच माझे खरे स्वप्न आहे व हे विदयार्थी उच्च दर्ज्याचे अधिकारी झाल्यानंतरच माझे खरे स्वप्न पूर्ण होईल.
यावेळी बालकलाकारणी आपल्या कला प्रकारातून आदिवाशी गीत,नमन गीत, जगदंब गीत,उगवली शुक्राची चांदणी,लावणी,विनोदी नाटिका असे असंख्य कला प्रकार सादर करून रसिक प्रेक्षकांची दाद मिळवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कल्पना भाबट यांनी केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी शाळेतील सर्व कर्मच्या-यानी परिश्रम घेतले.