आपला जिल्हा

चित्रकलेतून विद्यार्थ्यांनी रेखाटली रम्य पहाट व स्वच्छ व सुंदर गांव.

कल्पना शक्तीला वाव मिळण्यासाठी संस्थाध्यक्ष अनिलराव नखाते यांचे वाढदिवसानिमित्त चित्रकला व रंगभरण स्पर्धा.

सेलू (प्रतिनिधी ) : उगवलेला सुर्य,महिलांची स्वच्छतेसह पाणी भरण्यासाठीची लगबग,पक्षाच्या हालचाली,रस्त्यावर व्यायामासाठी फिरणारे नागरीक,गजबजलेला मंदीर परीसर अशी ती रम्य पहाट व स्वच्छतेसह पर्यावरणाचा संदेश असे एकाहून एक सरस कल्पनेचे अविष्कार साकारताना चिमुकल्यांचे हात रंगात माखून गेले होते. निमित्त होतं संस्थाध्यक्ष अनिलराव नखाते यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित शालेय चित्रकला व रंगभरण स्पर्धेचं.

श्रीमती शांताबाई नखाते प्राथमिक आश्रमशाळा वालूर येथे संस्थाध्यक्ष अनिलराव नखाते यांचा ९ आँक्टोंबर रोजी होणाऱ्या वाढदिवसानिमीतं ६ आँक्टोंबर रोजी चित्रकला व रंगभरण स्पर्धेचा शुभारंभ प्राचार्य रमेश नखाते, मुख्याध्यापक शाम मचाले, संजय वाशिंबे, गोविंद केंद्रे यांच्या उपस्थितीत झाला.पहिली ते चौथी गटासाठी विद्यार्थ्यांना रेखाटले चित्र दिली होती.यात विविध रंग भरून विद्यार्थ्यांनी आनंद द्विगुणित केला. तर ५ वी ते ७ वी गटासाठी रम्य सकाळ,स्वच्छ व सुंदर गाव, पर्यावरण रक्षण असे विषय दिले होते.यानुसार विद्यार्थ्यांनी आपली आवड व कल्पनाशक्तीच्या आधारे चित्र रेखाटन करून विविध रंग दिलेले अनेक चित्र लक्ष वेधून घेत होती. समाजातील चालू घडामोडींवर आधारित विषयांकडे विद्यार्थ्यांचा कल दिसुन आला.विजेत्या स्पर्धकांचे बक्षीस वितरण समारंभ शाळेत ९ आँक्टोंबर रोजी होणार आहे अशी माहिती संयोजकांनी दिली.स्पर्धेसाठी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!