सेलू ( प्रतिनिधी ) सेलू येथील श्रीराम प्रतिष्ठान विद्याविहार शैक्षणिक संकुल रवळगाव रोड, सेलू येथे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमीत ध्वजारोहनाचा कार्यक्रम (ता. 17) सप्टेंबर वार-रविवार रोजी क्रिडांगणावर पार पडला. यावेळी श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय रोडगे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. तसेच ज्ञानतीर्थ विद्यालय येथे संस्थेचे सदस्य डॉ. आदित्य रोडगे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले व प्रॉस्परस पब्लीक स्कुल येथे संस्थेच्या सदस्या डॉ. अपूर्वा रोडगे-पारवे यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सचिव डॉ. सौ. सविता रोडगे, आदरणीय डॉ. रामरावजी रोडगे, श्रीराम प्रतिष्ठानचे प्रशासकीय अधिकारी प्रा. महादेव साबळे व सर्व घटक संस्थेतील प्राचार्य डॉ. निलीमा सिंह, डॉ. बबन सोनवणे, डॉ. सौ. मिनाक्षी रत्नपारखी, प्रा. अशोक बोडखे, सौ. प्रगती क्षीरसागर, श्री. कार्तीक रत्नाला, सौ. शालीनी शेळके, श्री. करणसिंग चव्हाण, श्री. अक्षय बन आदि मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाची सुरुवात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमा पुजनाने झाली. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन हा महाराष्ट्र राज्यासाठी एक महत्वाचा दिवस आहे. दरवर्षी मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा केला जातो. 1948 मध्ये या दिवशी मराठवाडयातील निजामांची सत्ता संपुष्ठात आली आणि मराठवाडा भारताचा भाग बनला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत स्वतंत्र झाला मात्र यावेळी संपूर्ण देश विविध संस्थानामध्ये विखुरलेला होता. त्यावेळेच्या 565 पैकी 562 संस्थानानी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शवली आणि तशी कार्यवाही केली. मात्र हैद्राबाद संस्थान, जम्मु आणि कश्मीर आणि जुना गड ही संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती. हैद्राबाद संस्थानावर निजाम मीर उस्मान अली खान यांचे राज्य होते. हैद्राबाद संस्थानावर तब्बल सहा पिड्यापासून निजाम सरकाराचे राज्य होते. निजामाच्या राज्यातून मुक्त होऊन भारतीय संघराज्यात सामिल होण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेत्रत्वाखाली संपूर्ण हैद्राबाद संस्थानात मुक्तीसंग्राम सुरु झाला. अखेर 17 सप्टेंबर 1948 रोजी मराठवाडयाला निजामापासून स्वातंत्र्य मिळाले. त्यामुळे हा दिवस मराठवाडयातील जनतेसाठी अत्यंत महत्वाचा व आनंदाचा आहे. असे यावेळी बोलतांना डॉ. आदित्य रोडगे म्हणाले.
याप्रसंगी प्रिन्स इंग्लीश स्कुल मधील चिमुकल्यांनी देशभक्तीपर गित सादर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. संजय ठाकर व सौ. कल्पना भाबट यांनी केले.