सेलू ( प्रतिनिधी ) वाल्मिकी रामायणातून लक्ष्मण रेषेचा संदर्भ दिलेला नसताना देखील, लक्ष्मण रेषा म्हणजे मर्यादा आहे .त्यामुळे प्रत्येकाने मानवी जीवनात आपल्या मर्यादाची लक्ष्मण रेषा ओलांडली नाही पाहिजे .ती सांभाळली गेली पाहिजे. असे प्रतिपादन स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांनी केले आहे .
ते मंगळवार २२ ऑक्टोबर रोजी येथील हनुमानगढ परिसरात आर्शीवाचनपर बोलताना म्हणाले . सर्वात महत्त्वाचे म्हणजे महिलांनी तर अजिबात लक्ष्मण रेषा म्हणजेच मर्यादा ओलांडली न पाहिजे .महिलांनी मर्यादेत असायला पाहिजे. एवढेच नाही तर इतरांनाही मर्यादित ठेवायला पाहिजे. कोणाशी किती संबंध वाढवायला पाहिजेत, याचा विवेक घरंदाज महिलांना असतो .आणि तो असायलाच पाहिजे. एकमेकांशी आलेली जवळीक जीवनाचा घात करू शकते . मर्यादा ओलांडली गेली तर चांगुलपणा ही वाईट ठरतो. मर्यादेच्या आत सगळं चांगलं असतं .तसेच एखाद्या समाजाचं एखाद्या समाजावर होणारे आक्रमण, एवढेच नाही तर संस्कृती नष्ट करणार असेल तर ,समाज हा प्रतिकारक्षम असणे गरजेचे आहे.
कोणत्याही गोष्टींमध्ये घाईघाईने व धिंड काढून सहभागी होणे हे घातक आहे .त्यामुळे सर्वांनी सावधान राहणे आवश्यक आहे असेही स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले
लग्न म्हणजे संस्कार.
वाल्मिकी रामायणातील श्रीराम कथेचा संदर्भ देत प्रभू श्रीरामचंद्र व सुग्रीव यांच्या मैत्रीचा संस्कार हनुमंतांनी केला आहे संस्कार व करार यात फरक असून करार हा कधीही थांबवता येतो किंवा मोडू शकतो मात्र संस्कारातील बंधन हे एकमेकांना कायम बांधून ठेवतात त्यामुळे लग्न हा देखील एक संस्कार आहे तो करार नाही .असे आर्शीवाचनपर बोलताना स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांनी स्पष्ट केले. कोणत्याही करारामध्ये अटी असतात .मात्र संस्कार मध्ये धर्माचे पालन करावे लागते .घराबाहेर कायम वाह्यात वागणारी पुरुष घरी आल्यानंतर पत्नीशी चांगले वागतात ,त्याचे कारण पत्नीकडून कायम धर्माचे पालन होत असते. धर्मपरंपरेचे रक्षण भारतातील सर्व मातांनी केले आहे. त्यामुळेच सगळ्यात जास्त सुखी समाज भारतामध्ये आहे. आणि या सुखाचे रहस्य म्हणजे कुटुंब संस्था स्थिर आहे. आणि कुटुंब स्थिर असण्याचे कारण केवळ माता-भगिनी ह्याच आहेत. ७० टक्के माता भगिनींमुळे आपली कुटुंब स्थिर असून भारतीय संस्कृतीच्या संपूर्ण मर्यादेचे पालन माता भगिनी कडून केले जाते .जे की रामायणात लक्ष्मणाने संपूर्ण संस्कृतीच्या मर्यादेचे पालन केलेले आहे .ज्या ज्या ठिकाणी अन्याय होईल त्या त्या ठिकाणी जाऊन न्यायाची स्थापना करण्याचे काम भगवंताचे असते .म्हणून कोणावर अन्याय होत आहे का? याहीपेक्षा कोणाला न्याय मिळत आहे ,हे देखील तितकेच महत्त्वाचे असल्याचे स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
रावणासारखी सुरक्षा देखील नाही
भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण झालेली असताना देखील ,रामराज्य ही संकल्पना अमलात आणणे शक्य झाले नाही. त्या उलट रावणाच्या लंकेसारखी, आपल्या भारत देशाची सुरक्षा देखील आजपर्यंत भारताला करता आली. नसल्याची खंत स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की मेरा भारत महान ,असे न म्हणता मेरा भारत महान धर्मशाळा, असे म्हणणेच उचित होईल. कारण भारताच्या कोणत्याही सीमेवरून कोणीही आत घुसू शकते. देशाची सुरक्षा काय असते? हे आपणास चीन या देशाकडून शिकावे लागेल. असे स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.
हनुमंतासह वानर सेना
हनुमानगढ परिसरात सुरू असलेल्या रामकथेत, सुरुवातीपासून नियमितपणे दररोज प्रत्येक तीर्थक्षेत्राची प्रतिकृती साकारण्यात येते. त्याप्रमाणे मंगळवार २२- ऑक्टोबर रोजी बजरंग बली हनुमान यांचे कथेतील शूर कार्य दाखवताना हनुमंत यांचेसह वानर सेना यांची सजीव प्रतिकृती साकारण्यात आली होती. श्रीराम कथेतील या वानर सेनेचे नृत्य उपस्थितांचे लक्ष वेधत होते. वानर सेनेच्या वेशभूषेतील चिमुकली विद्यार्थी, उपस्थित सर्वांचे दाद मिळवून गेले.