आपला जिल्हा
जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्याकडून नुकसानग्रस्त भागांची पाहणी
बाधित भागाचे तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश

परभणी, दि. २ (प्रतिनिधी ): जिल्ह्यात अतिवृष्टीने बाधित झालेल्या ग्रामीण आणि शहरातील भागाची आज जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली. अतिवृष्टीमध्ये बाधित झालेल्या भागातील नुकसानीचे तातडीने पंचनामे पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी संबंधित यंत्रणेला दिले.




