सेलू: ( प्रतिनिधी ) येथील श्रीराम प्रतिष्ठान आयोजित सुरभी महोत्सवांतर्गत स्पोर्टस डे (ता.२४) वार रविवार रोजी विद्याविहार संकूल येथे पार पडला.
सूरभि महोत्सवाचे उद्घाटन बाळासाहेबांची शिवसेनेचे परभणी लोकसभा समन्वयक मा. आ. हरिभाऊ काका लहाने यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ संजय रोडगे, भाजप युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष मा. श्री सुरेश भुमरे, इंडियन आर्मी लेफ्टनंट संगमेश्वर मलवडे, भाजपाचे परभणी महानगर जिल्हाध्यक्ष मा श्री राजेश देशमुख, संस्थेच्या सचिव डॉ. सविता रोडगे,श्री रवींद्र घोडके, श्री प्रतापसिंह शिंदे, भाजपा जिल्हा सरचिटणीस श्री अर्जुन बोरुळ, श्री आबासाहेब डख, श्री कैलास मलवडे, शिवानी मलवडे, शिवाजी तरटे, भगवान गायकवाड, राठी, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे तसेच घटक संस्थेचे प्राचार्य प्रा. अशोक बोडखे, प्रा. डॉ. मीनाक्षी रत्नपारखी प्रा. डॉ. नीलिमा सिंग प्रा. डॉ.बबन सोनवणे प्रा. कार्तिक रत्नाला प्रा. प्रगती क्षीरसागर, मा. शालिनी शेळके, मा.करणसिंग चव्हाण मा. अक्षय बन, व्ही के मॅडम आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्रीराम प्रतिष्ठान ध्वजारोहण व मशाल पेटवून मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली. यानंतर एल के आर आर प्रिन्स इंग्लिश सीबीएसई स्कूल, ज्ञानतीर्थ विद्यालय, प्राॅस्परस पब्लिक स्कूल, एकात्मिक आदिवासी प्रकल्प, अपूर्वा पॉलिटेक्निक, आदित्य इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, डॉ.राम रोडगे डीएड व बी एड कॉलेज, च्या विद्यार्थ्यांनी सुंदर पद्धतीने पथसंचलन सादर केले. यानंतर विविध शाळेतील विद्यार्थ्यांनी ड्रील, एॅरोबिक्स, डंबेल्स, झुम्बा डान्स, म्युझिकल ड्रिल, लेझीम कराटे, वंदे मातरम थीमचे अंत्यत आकर्षक पद्धतीने चिमुकल्यांनी सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. डॉ. संजय रोडगे यांनी श्रीराम प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून चांगल्या प्रकारे शैक्षणिक व सामाजिक कार्य केल्याचे आज या विद्यार्थी रूपी वटवृक्षातून दिसुन येत आहे. विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी संस्थेच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या महोत्सवाचे आयोजन केल्याबद्दल मी अभिनंदन करतो. पालकांनी आपल्या पाल्यांना विविध स्पर्धेत सहभागी केले पाहिजे. खेळातून विद्यार्थ्यांची खिलाडूवृत्ती निर्माण होते असे प्रतिपादन हरिभाऊकाका लहाने यांनी केले. सर्व समाजाला सोबत घेऊन विद्यार्थी हाच केंद्रबिंदू समजत श्रीराम प्रतिष्ठानची सेलू शहरात उभारणी केली. शासनाच्या योजना अंतर्गत आपल्या भागातील आदिवासी समाज व धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना अत्याधुनिक सोयीसुविधा उपलब्ध करून दिल्या. सुसंस्कृत पिढी घडविण्याचे काम या शैक्षणिक संकुलात करण्यात येते. असे मते सुरेश भुमरे यांनी मांडले. याप्रसंगी श्री. राजेश देशमुख, लेफ्टनंट संगमेश मलवडे, श्री. कैलास मलवडे, श्री. अर्जुन बोरुळ आदींनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ममिता सिंग व संजय ठाकरे यांनी केले.